Manuscript Conservation Center
आपली अमूल्य संस्कृती आणि इतहिास वाचवा - आपल्या उज्ज्वल भवष्यिासाठी
विश्वगुरू भारताच्या पुर्नजीवनात सहभागी होण्याची सुवर्ण संधी!
द्वारा प्रायोजित
पांडूलिपी संरक्षण केंद्र
(Manuscript Conservation Centre)
खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव
मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव
नॅक द्वारा 'अ' श्रेणी प्राप्त (सी जी पी ए ३ १५),
आय एस ओ ९००१:२०१५,
विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारा घोषित ‘कॉलेज ऑफ एक्सलन्स’
मोहिम/मिशन :- (राष्ट्रीय पाण्डुलिपी मोहिम/मिशन)
भारत सरकारच्या पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयाने (नॅशनल मिशन फॉर मॅन्यस्कि्रप्टस) ची स्थापना फेब्रुवारी २००३ मध्ये केली.या अद्वितीय आणि भव्य प्रकल्पाचा हेतू भारतातील हस्तलिखितांच्या संपत्तीचा शोध लावणे आणि जतन करणे हा आहे.भारताकडे पाच लाख हस्तलिखितांचा अंदाज आहे, कदाचित जगातील हा सर्वात मोठा संग्रह आहे.यात विविध प्रकारचे विषय, पोत आणि सौंदर्यमूल्य , लिपी, भाषा, हस्तलिखिते, प्रकाशन (इल्युमिनेशन) आणि स्पष्टीकरण समाविष्ट आहेत.एकत्रितपणे, ते भारताच्या इतिहासाचे, स्मृतीचे व विचारांचे दर्शन घडवितात.ही हस्तलिखिते देशभरात आणि बाहेरही विखुरलेली आहेत.अनेक संस्थामध्ये तसेच खाजगी संकलनामध्ये ते दुर्लक्षित झाली आहेत.राष्ट्रीय पाण्डुलिपी मोहिम/मिशन (नॅशनल मिशन फॉर मॅन्यस्कि्रप्टस) हे भारतातील भूतकाळाला त्याच्या भविष्याशी जोडण्यासाठी व अभिमुख ठेवण्यासाठी अशा हस्तलिखितांमध्ये दस्तावेजीकरण करुन त्यांना संरक्षित करुन उपलब्ध करण्याच्या हेतूने काम करीत आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात दुर्मिळ हस्तलिखिते आणि कागदपत्रे विविध ठिकाणी (वैयक्तिक संग्रहाच्या रुपाने किंवा मठ, मंदिरे, मजिद, चर्च) जीर्ण होत असल्याचे दिसून येत आहे. सर्व धर्म, पंथ व संप्रदायांचा अशा प्रकारचा जो काही वारसा असेल त्याचे जतन व संरक्षण करणे आवश्यक आहे आणि आपला हा वारसा आणि ज्ञानसंपदेचे जतन व संवर्धन करणे ही अंत्यत गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या काळात पुरातन ज्ञानसंपदेला डिजीटायझेशन करुन भावी पिढीला उपलब्ध करुन देणे ही समाजातील सर्व घटकांची जबाबदारी आहे. यासंदर्भात राष्ट्रीय पांडूलिपी मिशन २००३ पासून देशाच्या विविध भागात जे पांडूलिपी चे शोध करून त्यांचे जतन व संरक्षण करण्याची मोहिम राबविण्यात आली आहे.
खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी ही गेल्या ७० वर्षांपासून खानदेशातील एक नामांकित शैक्षणिक संस्था आहे जी अनेक वर्षांपासून देशाच्या विकास आणि निर्माणमध्ये योगदान उत्तमरित्या देत आले आहे अशाप्रकारे उत्तम परंपरा असलेली ही संस्था आपली सामाजिक जबाबदारी म्हणून भारताचा इतिहास व संस्कृतीचे जतन करणे व त्याप्रती विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्याचे कार्य उचललेले आहे खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ग्रंथालयाद्वारा दुर्मिळ हस्तलिखित व कागदपत्रांचे जतन, संवर्धन आणि डिजीटायझेशन करण्यासाठी मागील चार वर्षांपासून केले जात आहे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उपलब्ध असलेली दुर्मिळ हस्तलिखिते आणि कागदपत्रे डिजीटायझेशन करण्यासाठी महाविद्यालयास कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे कुलगुरु सहायतानिधी अंतर्गत प्रकल्पांतर्गत २०१६ ते १०१८ या वर्षात महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवरील व्यक्तींकडून त्यांच्याकडे उपलब्ध असलेले दुर्मिळ पांडूलिपी महाविद्यालयाकडे सुपूर्द केले होते त्यानुसार आतापर्यंत सुमारे ३०० दुर्मिळ हस्तलिखितांचे डिजीटायझेशन करून त्यांना ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करुन ते सर्वांसाठी उपलब्ध केले गेले आहे
महाविद्यालयाचे हे कार्य पाहून महाविद्यालयाच्या ग्रंथालयास पांडूलिपी संरक्षण केंद्र (Manuscript Conservation Centre) स्थापना करण्यास २०१८ मध्ये राष्ट्रीय पांडूलिपी मिशन द्वारा मंजुरी मिळाली आहे ह्या प्रकल्पांतर्गत आता मूळजी जेठा महाविद्यालयाने महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी व्यक्ती आणि संस्थांकडे उपलब्ध असलेले पांडूलिपींना जतन व संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे भारत सरकार द्वारा चालविण्यात येणा-या ह्या मोहिमद्वारा आपल्या अमूल्य परंपरांचा किंवा ज्ञानसंपदांचा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कर्तव्य आपल्या सर्वांवर आहे आणि हे कार्य मूळजी जेठा महाविद्यालय अंत्यत अभिमानाने पूर्णत्वास नेण्यास इच्छुक आहे पण, हे कार्य केवळ एक व्यक्ती किंवा संस्थेद्वारा पुर्ण करणे अशक्य आहे यात नामांकित व्यक्ती, मंदिरे, मठ, संस्था पासून सामान्य व्यक्तींनी याकार्यात सहभागी होण्याशिवाय पूर्ण होणार नाही
योग्य प्रकारे जतन व संरक्षणासोबत डिजीटायझेशन केलेल्या पांडूलिपींचे महाविद्यालयाच्या आवारात सांभाळून ठेवण्याची व्यवस्था योग्यप्रकारे करण्यात आलेली आहे त्यामुळे व्यक्ती वा संस्था त्यांच्याकडील पांडूलिपी महाविद्यालयाकडे हस्तांतरित करू शकता तसे करण्यास सदर व्यक्ती वा संस्था इच्छूक नसल्यास मूळजी जेठा महाविद्यालयाद्वारा पांडूलिपींचे संपूर्ण संरक्षण प्रक्रिया विनामुल्य करून ते आपणांस परत दिले जातील पांडूलिपी संरक्षण केंद्र (Manuscript Conservation Centre) चा मुख्य उद्देश पांडूलिपींचे जतन व संरक्षण करुन त्यांचे आयुष्य वाढावे हाच आहे भले सदर ज्ञानसाहित्य आमच्या महाविद्यालयाकडे असेल किंवा पांडूलिपींचा मूळ स्त्रोतकडे असो, याबाबींकडे लक्ष घालणे गरजेचे आहे
अंत्यत जीर्ण झालेली पांडूलिपी ह्या योग्य प्रकारे रासायनिक व इतर प्रक्रिया करुन संरक्षण केल्यास त्यांचे आयुष्य किमान २०० ते ३०० वर्ष वाढते ज्यामुळे सदर ज्ञानसंपदा भावी पिढीसाठी, संशोधक आणि आवड असणा-यांना सहज उपलब्ध होतील
डिजीटायझेशन केलल्या हस्तलिखितांची एक डीजीटल प्रत सी डी /डी व्ही डी स्वरुपात हस्तलिखित धारक व्यक्ती/संस्थांना कृतज्ञता म्हणून देण्यात येईल आणि त्याहस्तलिखितांचा स्त्रोत म्हणून त्या संस्था/ व्यक्तींचे श्रेयनिर्देश करण्यात येईल
हस्तलिखित संग्रहांचे प्रभाविपणे जतन व संवर्धन करण्यासाठी आणि हस्तपुस्तिकामध्ये (मॅन्युअल) माहिती लागु करण्यापूर्वी ही हस्तलिखिते जतन करण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान मुलभूत आवश्यकता समजून घेणे, ही जबाबदारी असलेल्या सर्व व्यक्तीसाठी आवश्यक आहे.ह्या पुस्तिकेप्रमाणे हस्तलिखित संकलनांच्या संरक्षणास सोयीस्कर होण्यासाठी आवश्यक असणारे किमान मुलभूत मानक असणे आवश्यक आहे.ज्याव्दारे भारतातील हस्तलिखितांचे संकलन करता येईल.या मुलभूत मानकांची पूर्तता झाल्यानंतर, पुढील पाऊल संग्रह व्यवस्थापन व संवर्धन उच्च पातळीवर जाणे असेल.याप्रकल्पांतर्गत आपणाकडे उपलब्ध असलेली वा आपणांस ज्ञात असलेली हस्तलिखित यांचे संरक्षण आणि डिजीटायझेशन करण्यासंदर्भात आपणासोबत काम करण्यास आम्ही इच्छूक आहोत एक सामाजिक जबाबदारी समजून आम्ही आपल्या संस्थेसोबत हे डिजीटायझेशन चे कार्यात सहभागी होऊ इच्छितो आपल्या संस्थेकडे एखादे हस्तलिखित व कागदपत्रांचे जतन व संरक्षणासोबत डिजीटायझेशनचे कार्य करावयाचे असतील तर मूळजी जेठा महाविद्यालय ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे यासाठी आवश्यकतेनुसार लागणारे यंत्र सामुग्री, तंत्रसहाय, मानव संसाधन हे सर्व घेऊन आपणांकडे डिजीटायझेशन विनाशुल्क करण्यास तयार आहोत जर आमच्या सहभागातुन आपल्याकडे असलेल्या हस्तलिखितांचे डिजीटायझेशन चे कार्यात मदत होऊन हस्तलिखित व कागदपत्र यांचे जतन करण्यात आल्यास या प्रकल्पाचे उद्धीष्टे साध्य होईल
यासंदर्भात आपणांस विनंती आहे की, आपणांकडे इतर परिसरातील दुर्मिळ हस्तलिखितांची उपलब्धतता बलची माहिती असेल तर तीमाहिती आम्हाला कळवावी जे संग्रहकार/ संस्था आपल्याकडे असलेली हस्तलिखिते डिजीटायझेशन करु इच्छितात त्यांना या संदर्भात आश्वासन दिले जाते की, त्यांच्याकडून मिळणार्या हस्तलिखितांचा कुठलाही व्यापारात्मक उपयोग होणार नाही भारतीय संस्कृतीचे संरक्षण हा उध्येश डोळयासमोर ठेऊन या उपक्रमास सहकार्य करावे
आम्ही आशा करतो की, या पुस्तिका वाचकांकडून आलेल्या अभिप्राय मानकांना अधिक परिपूर्ण, व्यावहारिक आणि प्रभावी बनविण्यास मदत करतील.या राष्ट्रीय मिशनमध्ये आम्हांला प्रत्येक जण एक सक्रिय खेळाडू बनवण्यासाठी आमंत्रित आहे.भारत सरकार द्वारा चालविण्यात येणा-या आणि मूळजी जेठा महाविद्यालयात राबविण्यात येणा-या ह्या प्रकल्पाचा समन्वयक म्हणून महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. विजय श्रीनाथ कंची यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सदर प्रकल्पांतर्गत सहभागी होण्यास इच्छुक व्यक्तींनी वा संस्थांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
हस्तलिखितांचा थोडक्यात इतिहास
भारताच्या हस्तलिखितांनी शतकानुशतके जगावर अधिराज्य गाजवले आहेसातव्या शतकाच्या प्रारंभी चिनी प्रवासी हयुएन त्संगने भारतातील शेकडो हस्तलिखिते आपल्या सोबत नेलीनंतर अठराव्या शतकाच्या उत्तराधार्थ, अवधांच्या नवाबाने इंग्लंडचा राजा जॉर्ज तिसरा याला पदशनामाचे एक अप्रतिम हस्तलिखित भेट दिलेआज, रॉयल कलेक्शनमधील सेवाउत्कृष्ठ तुकड्यापैकी ते एक मानले जातेजेव्हा इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनी प्रथम भारतात आली तेव्हा त्यांनी उपमहाद्वीपला बौध्दिक आणि कलात्मकतेने भरलेले एका महान आणि समृध्द सभयतेचा वाहक मानले.भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसह भाषा, तत्वज्ञान, कला आणि शिल्पकेलेने अनेक कंपनी अधिकाऱ्याना मोहित केलेत्याची जिज्ञासा १९ व्या शतकाच्या सुरुवातीला रॉयल एशियाई जर्नलचे आरंभीच्या प्रकाशनांमध्ये दिसून येते
भारतीय उपमहाद्वीप सभयतेच्या विविध पैलूंवर पध्दतशीरपणे अभयास करणारा आणि प्रतिबिंबितकरणाऱ्या अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वधातील पहिले गट स्थापन करणाऱ्या अनेक असामान्य नेत्यांमध्ये, बंगालमधील एशियायिक सोसायटीचे संस्थापक विल्यम जोन्स, तेलगु सीपी ब्राऊन, प्रवासी आणि पूर्व भाषा विद्वान जॉन लेडन, भारताचे प्रथम सर्व्हेअर जनरल कॉलिन मॅकेन्झी, संस्कृतचे विद्वान चार्ल्स विल्किंस, असंख्य संस्कृत भाषांतराचे भाषांतरकार एच.एच.विल्सन आणि बहुआयामी ओरिएंटलिस्ट एच.टी.कोलेब्रुक यांचा समावेश होतो.बहुतांश वैयक्तिक संग्रह भारतातील कार्यालय आणि संस्थामध्ये तसेच इतर ठिकाणी ब्रिटनमध्ये जमा केलेले आहे.
इ.स.१८०३ च्या सुरुवातीस '' सर्व उपयोगी भारतीय साहित्य आला त्यांचा सारांशासह अस्तित्वात आहे'' ही एशियाटिक सोसायटीमध्ये (एम.एल.ए.बुलेटिन, ५ १ साहित्य आणि भारतीय भाषा'' आ.य एल.सैनी '' पाण्डुलिपी साहित्य आणि भारतीय भाषा '' आय.एल.ए.बुलेटिन, ५ १, जाने-मार्च १९६९, पृष्ठ (P P )६-२१.चार वर्षानंतर एच.टी.कोलब्राक यांनी सोसायटीचे चौथे अध्यक्ष या नात्याने सरकारला अशा प्रकारचे (कॅटलॉग) यादी (Ibid) दरवर्षी देण्यासाठी पाच किंवा सहा हजार रुपये अतिरिक्त अनुदान बाजूला ठेवण्याची विनंती केली.कंपनीने निधी मंजूर केलेला नसला तरी 'ओरिंएटलिस्टांनी कॅटलॉग तयार केले होते.
हस्तलिखितांसाठी (मॅन्युस्कि्रप्टस) राष्ट्रीय मोहिमची/ मिशनची प्राथमिक उदिष्टे म्हणजे हस्तलिखित जतन करणे.हस्तलिखितांची वृध्दी वाढविण्याचा हेतू प्रतिबंधात्मक संरक्षण तसेच हस्तलिखितांवरील उपचारात्मक उपचारांव्दारे प्राप्त करणे शक्य आहे.त्यासाठी मूलभूत पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित संरक्षण कर्मचाऱ्यांची एक स्त्रोत बँक तयार करणे आवश्यक आहे.राष्ट्रीय पाण्डुलिपी मिशन (NMM) हस्तलिखित संवर्धन केंद्राना पाठिंबा देत आहे.विविधसंस्था देखील हस्तलिखिते जतन करण्याच्या कार्यात एक संकल्प म्हणून किंवा स्वतंत्ररित्या त्यांच्या संग्रहाची काळजी घेण्यात सहभागी आहेत.
शेकडो संग्रहालये, ग्रंथालये, संशोधन संस्था, अभिलेखागार, संरक्षण केंद्र आणि भारताच्या विविध भागातील व्यक्ती भारताच्या हस्तलिखित वारसाच्या संरक्षणासाठी उत्कृष्ट सेवा देत आहे.त्यासाठी अनेकवेळा वेगवेगळी मार्गदर्शक तत्वे आखण्याची गरज आहे.याचा उल्लेख केला आहे.की, ज्याव्दारे व्यक्ती व संस्थांना त्यांचे संकलन व्यवस्थितपणे जतन करण्यास मदत करतील.हस्तलिखितांचे निंरतर संग्रह राखण्याचे काम साध्य करण्यासाठी प्रथम हस्तपुस्तिका (मॅन्युअल) लिहिणे आवश्यक आहे असे ही सुचविण्यात आले आहे.
हस्तलिखित म्हणजे काय ?
हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेले ग्रंथ.हस्तलिखित हे कागद, कापड, धातू, विशिष्ट प्रकारची पाने उदा.पायचे पान इत्यादींवर हाताने लिहिलेले असते.ते महत्वपूर्ण वैज्ञानिक, ऐतिहासिक किंवा सौंदर्यमूल्य असणारे किमान ७५ वर्ष जूने साहित्य असते.शिलालेख आणि मुद्रित खंडांना हस्तलिखित म्हणता येणार नाही.हस्तलिखिते शेकडो विविध भाषांमध्ये आणि लिपीमध्ये आढळतात.बऱ्याचदा एक भाषा विविध लिपींमध्ये लिहिली जाते.उदाहरणार्थ, संस्कृत, उडीया लिपी, ग्रंथ लिपी, देवनागरी लिपी इतर अनेक लिपीमध्ये लिहिलेले आहे.
हस्तलिखित ग्रंथांच्या संग्रहाला सरस्वती भांडागार असे म्हटले जाते. उदाहरणार्थ अशी भांडागारे विविध मठांमध्ये, राजे-राजवाड्यांच्या संग्रही असतात.हस्तलिखितांमध्ये धर्म, तत्वज्ञान, काव्य आणि नाटक या विषयांवरील ग्रंथ अधिक आढळतात.हस्तलिखित ग्रंथांचे लेखन करणे ही अवघड कला आहे.
हस्तलिखित ऐतिहासिक नोंदीपेक्षा वेगळे आहेत.फार्मान , महसूल रेकॉर्ड वरील शिलालेख जे इतिहासात किंवा प्रसंगी प्रत्यक्ष माहिती देतात त्यांना हस्तलिखित म्हणता येणार नाही.हस्तलेखांमध्ये ज्ञान सामग्री असते.शास्त्रीय अर्थाने, 'हस्तलिखित' हा शब्द एखाद्या लेखकाने लिहिलेल्या दस्तऐवजास संदर्भित करतो.जगातल्या प्रत्येक भागात हस्तलिखिते आढळतात.जेथे मानव त्यांचे विचार आणि अनुभव लिखित स्वरुपात देतात.युगानुयुगे माणसांनी साहित्य लिहिण्यासाठी दगड, धातू आणि चर्मपत्रदेखील वापरले असले तरी मख्यतः वनस्पतीजन्य सामग्री वापर करुन लिहिलेल्या हस्तलिखित पुरता आपला संदर्भ मर्यादित आहे.
या वनस्पती सामग्री एक झाड किंवा झाडाची पाने असू शकतात किंवा लिहिण्यासाठी खास तयार कलेले एक पान असू शकते.ही सामग्री झाडाची साल पण असू शकते; तो पातळ पत्रांच्या स्वरुपात वाळलेल्या वनस्पती साहित्याच्या लगद्यापासून पारंपारिक पध्दतीने हाताने तयार केलेल्या कागदाच्या स्वरुपात असू शकते.आणि अधिक अलीकडील उत्पादन पाहता ते आधुनिक कागद कारखान्यांतील पातळ कागदाच्या स्वरुपात असू शकते.पुरातन काळातील इ.स.पूर्वच्या तिसर्या मिलेनियम इजिप्त मध्ये पपरी वनस्पती सामग्रीपासून कागद तयार केल्याचे पुरावे आढळतात.भारतामध्ये, पामचे पान व झाडांच्या फांद्या हे प्रमुख लेखन आधार होते.अकराला शतकामध्ये हळूहळू कागदाचा वापर सुरु झाला.
डॉ.विजय श्रीनाथ कंची
ग्रंथपाल
मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव-४२५००२
मोबा ९४०३६७३६१८ / ८९९९८२७०६०
इ-मेलः mjcollegelibrary@gmail com,
vskanchi@gmail com
आपली अमूल्य संस्कृती आणि इतिहास वाचवा - आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी